पुणे: टीम इंडियासाठी वर्ष बदललय. कॅप्टन बदललाय. टीम बदललीय. पण टीमची सवय मात्र बदलेली नाही. नव्या वर्षातील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा पराभव थोडक्यात टळला. टीम इंडियाने अवघ्या 2 रन्सनी निसटता विजय मिळवला. नव्या वर्षात टीम बदललीय. पण जुनी सवय मात्र कायम आहे. पुण्यातही तीच सवय कायम राहिली, तर कदाचित मुंबईसारखी नशिबाची साथ मिळणार नाही. पराभव लिहिला जाईल. मुंबईत टीम इंडियाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता.

ही जुनी सवय कुठली?

तुम्हाला प्रश्न पडला असेल, टीम इंडियाची ही जुनी सवय कुठली आहे? मुंबईत टीम इंडियाचा टॉप ऑर्डर फेल झाला. काही विकेट्स झटपट गेल्या. टीम इंडिया बऱ्याच प्रमाणात टॉप ऑर्डरवर अवलंबून असते. मुंबईत नव्या टीमची हीच स्थिती होती. जुन्या टीमची सुद्धा हीच कमजोरी होती.

अधिक वाचा  पुण्यात भाजपच्या हालचालींना वेग, उपमुख्यमंत्री फडणवीस पुण्यात तळ ठोकून, रात्रीच्या बैठकानंतर आज दिवसभर बैठकांचं सत्र

नवीन टीम इंडिया कशी?

टीम इंडियाच्या नव्या आणि जुन्या टीममध्ये काय अंतर आहे? ते समजून घ्या. पहिल्या टी 20 सामन्यात दोन प्लेयर्सनी डेब्यु केला. ओपनर्स बदलले. मीडल ऑर्डरमध्ये अनुभवी फलंदाजांची कमतरता होती. गोलंदाजांची फळी सुद्धा तुलनेने नवीन होती. जुन्या टीममध्ये रोहित, राहुल, विराट, शमी आणि भुवनेश्वर सगळे एकत्र खेळताना दिसायचे. नव्या वर्षात मुंबईच्या मैदानावर उतरलेल्या टीममध्ये मोठी नावं नव्हती.

टीम नवी पण सवय मात्र जुनी

नव्या टीमकडून जी अपेक्षा होती, ते त्यांनी केलं. पण जे करायला नको होतं, ते सुद्धा केलं. म्हणूनच पुण्यात त्याच चुकांची पुनरावृत्ती परवडणार नाही. मुंबईत पहिल्या सामन्यात टॉप ऑर्डरचे बॅट्समन चालले नाहीत. त्याचा दबाव टीमवर दिसून आला. वरच्या फळीतील बॅट्समनमध्ये पार्टनरशिप झाली नाही. निम्मी टीम 14.1 ओव्हर्समध्ये 92 धावात तंबूत परतली होती. पुढच्या सामन्यात टीम इंडियाला ही चूक परवडणारी नाही. वानखेडेवर 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणं कठीण नाहीय. पण श्रीलंकेला ते नाही जमलं. आता पुण्यात त्यांचे बॅट्समन अशी चूक करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे टीम इंडियाला चूका सुधाराव्या लागतील.