नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची लागण होण्याचा दर देशातील बर्‍याच राज्यांत वेगाने वाढत आहे. पण महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, हरियाणा, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर आणि उत्तर प्रदेशात अतिवेगवान वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास असे दिसून आले आहे की, गेल्या दहा दिवसांत या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन रुग्ण आढळले आहेत.
दिल्लीत जेथे 15 दिवसांपूर्वी दररोज सुमारे एक हजार प्रकरणे नोंदवली गेली. आता मात्र दररोज सरासरी 1300 प्रकरणे नोंदवली जात आहेत. गुरुवारी तर हा आकडा 1500 च्या पुढे गेला आहे. तामिळनाडूमध्ये जेथे 700 ते 800 प्रकरणे पुढे येत होती, आता मात्र दररोज 1300 हून अधिक नवीन प्रकरणे पुढे येत आहे आणि गुरुवारी तर 1927 प्रकरणे नोंदविली गेली. हरियाणामध्ये हाच दर तिप्पट झाला आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये दुप्पट झाल्याचे दिसून आले आहे.
सध्या देशातील सात राज्यात दहा हजाराहून अधिक नवी प्रकरण पुढे आलेले आहेत. यासह, देशातील सर्वाधिक संक्रमित राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेश पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. हरियाणामध्ये अवघ्या चार दिवसांत 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हरियाणामध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे.
गेल्या 7 जूनपर्यंत कोरोनामधून राज्यात केवळ 24 जणांचा मृत्यू झाला होता पण 11 जून रोजी हा आकडा 52 झाला.
उत्तर प्रदेशामध्ये दोन दिवसांत विक्रमी मृत्यूची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेशामध्ये 31 मेपर्यंत 201 लोकांचा मृत्यू झाला होता. परंतु, गुरुवारपर्यंत 321 लोकांचा मृत्यू झाला होता.
गेल्या दोन दिवसांत तेथे विक्रमी मृत्यूची नोंद झाली आहे. दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाने गेल्या 31 मे पर्यंत 416 जणांचा बळी घेतला. परंतु, गुरुवारी ही संख्या 984 च्या वर पोहचली. देशातील महाराष्ट्रासह या सात राज्यात जर कोरोना विषाणूचा प्रसार रोखता आला नाही तर परिस्थिती अजून भयंकर होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  मोदीजी तुम्हाला सहा भाऊ, योगी आदित्यनाथांना… , मग फक्त मुस्लिमांवरच टीका का? काँग्रेस नेत्याचा बिनतोड सवाल