‘जनतेमध्ये केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करत असून त्यासाठी हा अविश्वासाचा प्रस्ताव आला आहे’, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत म्हटलं आहे तसेच जनेतवर आमचा पूर्ण विश्वास आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना देखील चोख उत्तर दिलं आहे. मणिपूरच्या मुद्द्यावरुन इंडिया आघाडीकडून लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा सध्या सुरु आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सरकारची बाजू लोकसभेत मांडली आहे.

पंतप्रधान मोदी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान
दोन वेळा आम्ही बहुमताने निवडून आलो आहोत असं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय पंतप्रधान असल्याचं अनेक अहवालातून स्पष्ट झालं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. सरकारने त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून, पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार आणि घराणेशाही हटवली असं अमित शाह म्हणाले आहेत.

‘जनता सगळं बघते, त्यांना सगळं माहित आहे’
टअविश्वासाचा प्रस्ताव जेव्हा तु्म्ही घेऊन येता तेव्हा तुम्ही सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात, त्यामुळे याबाबत सरकारची बाजू मांडणं गरजेचं आहे, म्हणून मी इथे उभा आहेट, असं त्यांनी म्हटलं आहे. तर या अविश्वास प्रस्तावावर कोणालाच विश्वास नसल्याचं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, ‘ जनता सगळ बघत आहे त्यांनी सगळं माहित आहे त्यामुळे त्यांच्यात संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही.’

अधिक वाचा  एकनाथ खडसेंची ‘घरवापसी’ यामुळे का अडकली? समोर आली मोठी अपडेट

अमित शाह यांचा काँग्रेसवर निशाणा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं की, अविश्वास प्रस्तावाला आमचा कोणताही आक्षेप नाही. पण आपलं स्वत:चं सरकार वाचवण्यासाठी भ्रष्टाचार करणं हे युपीएचं वैशिष्टये आहे. पंतप्रधान मोदींनी ‘भ्रष्टाचार छोडो भारत, राजवंश छोडो भारत आणि तुष्टीकरण छोडो भारत’चा नारा दिला आहे. सत्तेचे रक्षण करणे हे युपीएचं काम आहे, असं म्हणत अमित शाह यांनी काँग्रेसवरुन निशाणा साधला आहे.

अमित शाह यांच विरोधकांवर टीकास्त्र
फक्त तुम्हालाच सरकारवर अविश्वास आहे देशाच्या जनेताला सरकावर अविश्वास नाही असं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे. तर या अविश्वासाच्या प्रस्तावाला काही अर्थ नसल्याचं म्हणत अमित शाह यांनी सरकारच्या कामाचा पाढा वाचला.

देशाविरोधात कारवाई करणाऱ्यांवर कारवाई केली – अमित शाह
मोदी सरकारच्या काळात काश्मिरमधील दहशतवाद संपवण्यांचं काम आम्ही केलं आहे. पीएफयावर आम्ही बंदी घातली. काश्मिरमधील दलित आदिवासींना आम्ही आरक्षण दिलं. तर देशाविरोधात कारवाई करणाऱ्यावर आम्ही कारवाई केली असं अमित शाह यांनी संसदेत म्हटलं आहे.

मणिपूरमधील घटना लज्जास्पद
मणिपूरमधील घटना ही लज्जास्पद आहेच पण त्यावर राजकारण करणं हे त्याहून लज्जास्पद असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे. तर सरकार हे मणिपूरच्या मुद्द्यावर तयार असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे. तर विरोधकांना ही चर्चा व्हायला नकोय असा दावा देखील त्यांनी केला आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधक चर्चा होऊ देत नाही असा आरोप अमित शाह यांनी विरोधकांवर केला आहे. तर यावेळी गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारने मणिपूरमध्ये केलेल्या कामांविषयी देखील माहिती दिली आहे.

अधिक वाचा  भोसरीकरांचा एकच निर्धार, आढळराव पाटील पुन्हा खासदार

अमित शाह यांच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे सविस्तर जाणून घेऊया.

मणिपूरच्या मुद्द्यावर सरकार चर्चा करण्यास तयार
मणिपूरच्या मुद्द्यावर सरकार चर्चा तयार आहे पण विरोधक या मुद्द्यावर चर्चा होऊ देत नसल्याचं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसेच मणिपूरची घटना ही लज्जास्पद आहेच पण त्यावर राजकारण करणं हे त्याहून लज्जास्पद असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

अविश्वास प्रस्ताव आणि राजकारण
हा अविश्वासाचा प्रस्ताव केवळ जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणला असल्याचं म्हणत अमित शाह यांनी अविश्वासाच्या ठरावावर भाष्य केलं आहे. तसेच विरोधकांचे हे फक्त राजकारण असून यामधून काहीही होणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक हे संपूर्ण जगांनं केलं आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय पंतप्रधान असल्याचं म्हणत अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.

शेतकऱ्यांना मदतीचा हात
मोदी सरकारने शेतकऱ्यांना कायम मदतीचा हात दिला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठिशी हे सरकार उभं असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  … नाहीतर माझं काही खरं नाही… अजित पवार यांनी प्रचारात सांगितला

मोदी सरकारच्या काळात काश्मीरचा विकास
मोदी सरकारच्या काळात काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात आणला आहे. तसेच काश्मीरमधील पर्यटनला चालना दिल्याचं देखील माहिती देखील अमित शाह यांनी दिली आहे. 2014 पर्यंत काश्मीरमध्ये फक्त राजकारण सुरु होतं असं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती
पुढील काही काळात देशाची अर्थव्यवस्था ही महत्त्वाच्या टप्प्यावर असणार असल्याचा विश्वास देखील अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.

अमित शाह यांच विरोधकांवर टीकास्त्र
फक्त तुम्हालाच सरकारवर अविश्वास आहे, देशाच्या जनेताला सरकावर अविश्वास नाही असं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे.

पीएफआयवर बंदी घातली
पीएफआयवर आम्ही बंदी घातली. काश्मीरमधील दलित आदिवासींना आम्ही आरक्षण दिलं. तर देशाविरोधात कारवाई करणाऱ्यावर आम्ही कारवाई केली असं अमित शाह यांनी संसदेत म्हटलं आहे.

कोरोना काळातील सरकारचं काम
कोरोना काळात सरकारने मोफत लस दिल्याचं देखील अमित शाह यांनी म्हटलं आहे. तसेच गरिबांना मोफत रेशन देखील आम्ही त्या काळात वाटलं अशी माहिती देखील त्यांनी सभागृहात दिली आहे.

अमित शाहांचा राहुल गांधींवर निशाणा
अमित शाह यांनी त्यांच्या भाषणादरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. यावेळी बोलतांना त्यांनी म्हटलं की, ‘एकचा नेत्याला एका पक्षाने 13 वेळा लाँच केले आहे.’