मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये 2 जुलैला सामील झाले. त्यांनी आपल्या सहाकाऱ्यांसह मंत्रिपदाची शपथही घेतली. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहे. राज्यातील एका वर्गाकडून अजित पवार यांच्या या कृतीचं समर्थन होतंय. तर काहीजण याचा कडाडून विरोध करत आहेत. सामनाच्या आजच्या अग्रलेखातून या युती सरकारवर टीका करण्यात आली आहे. राज्यात ‘एक (डाऊट) फुल , दोन हाफ ‘ नवा चित्रपट लागलाय, या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे.

सामनाचा अग्रलेख जसाचा तसा
महाराष्ट्रात भाजपने जे केले त्यामुळे संपूर्ण देशात त्यांची छिः थू होत आहे. आता फक्त मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विजय मल्ल्या यांनाच काय ते पक्षात घेऊन पद वाटप करायचे बाकी आहे. या तिघांपैकी एकास पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार, दुसऱ्यास निती आयोग व तिसऱ्यास देशाच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नेमले जाईल. कारण भ्रष्टाचार, लुटमार, नैतिकता हा आता त्यांच्यासाठी मुद्दा राहिलेला नाही.

अधिक वाचा  अजितदादांमुळे घरात अस्वस्थता? ते खरेतर फक्तं यामुळं अस्वस्थ शरद पवार पहिल्यांदाच बोलले …ही मोठी चिंता!

अजित पवारांनी फडणवीस यांच्या साक्षीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व सोमवारी हे ‘चक्की पिसिंग’ फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर त्यांच्या गटाचे खातेवाटप करीत बसले, आश्चर्यच आहे! खातेवाटपाची चर्चा मुख्यमंत्र्याच्या ‘वर्षा’ बंगल्यावर व्हायला हवी होती, पण अजित पवार व त्यांचा गट पोहोचला ‘सागर’वर. हे आश्चर्यच म्हणायला हवे. मुख्यमंत्र्यांची ही अशी अवस्था केविलवाणी आहे व दिवसेंदिवस ती अधिकच दयनीय होत जाईल.

मोदी-शहा-फडणवीसांच्या व्यापारी राजकारणाने या परंपरेस चूड लावली आहे. आणखी एक आश्चर्य असे की, श्री. शरद पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत व अजित पवार, प्रफुल पटेल वगैरे लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष चिन्हासह आपलाच असल्याचे जाहीर करून टाकले.

अधिक वाचा  अजित पवारांची ताकद वाढणार?; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत येणार मुंबईसह अन्य ठिकाणीही फायदा

शिवसेना फुटीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला की, विधिमंडळातील फुटलेला गट म्हणजे पक्ष नव्हे. हे ‘फुटके’ पक्षावर दावा सांगू शकत नाही. हे सत्य असताना ‘पक्ष व चिन्ह’ आमचेच असे सांगणे हे फाजील आत्मविश्वासाचे लक्षण आहे. पण दिल्लीतील महाशक्तीने डोक्यात हवा भरली की हे फाजील आत्मविश्वासाचे फुगे फुगतात. शिवसेना जशी जागच्या जागी राहिली तसेच चित्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत दिसत आहे.