उद्धव ठाकरे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे आज सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. हा पक्ष आहे का चोरबाजार असा घणाघात त्यांनी केला. उद्धव ठाकरे म्हणाले, मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. मी नव्या जोमाने आणि दमाने उभा आहे. काही केलं तरी मी पुन्हा जिंकणार म्हणजे जिंकणारच. गुवाहाटीला गेले. काय झाडी, काय डोंगार सगळं ओके. इथल्या गद्दारांना तुम्हीच आमदार आणि खासदार केलं. या ताईंना धमक्या दिल्या. मुंबईवरून दलाल पाठवले जायचे. त्यांच्यावरील आरोप वाचले जायचे. त्यांच्या आजूबाजूच्या दलालांना अटक केली. पण ताई हुशार. ताईंनी थेट पंतप्रधानांना राखी बांधली. भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना… तो फोटो छापून आणला. सीबीआय आणि ईडीची हिंमत आहे का मग अटक करायला. ही चालूगिरी आपल्याला समजत नाही का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. भाजप हा भाकड पक्ष झाला आहे. विचार संपले आहेत. नेते संपले आहेत. त्यांचे सर्व नेते आयात केलेले आहेत. हा आयात पक्ष आणि त्यांची दादागिरी सुरू आहे. या आयात पक्षाची दादागिरी मोडता येणार नाही का. हा पक्ष आहे का चोरबाजार आहे. यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

अधिक वाचा  ईडीचं पुन्हा समन्स, अमोल कीर्तिकर यांच्या अडचणी वाढल्या, माध्यमांसमोर येत म्हणाले…

आपल्या छत्रपतींचा अपमान सुरू आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातच्या निवडणुकीसाठी गुजरातमध्ये वळले. का नेताय तर गुजरातच्या निवडणुका जिंकायच्या. कालपरवा बोम्मई बोंबललेत. त्यांनी सोलापूरवर हक्क सांगितला. अक्कलकोटवर हक्क सांगितला. पुढच्या वर्षी कर्नाटकाच्या निवडणुका आहे, असही ते म्हणाले. मला भीती वाटते महाराष्ट्रात येणारे उद्योग त्यांनी गुजरातला नेले. तसेच महाराष्ट्रातील हे तुकडे करायला मागे पुढे पाहणार नाही. का तर कर्नाटकाच्या निवडणुका आहे, असंही त्यांनी म्हंटलं.