जालना : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. बंडखोर आमदार आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबले आहेत. यादरम्यान या सत्तानाट्यात भाजपने उडी घेतली आहे, भाजपचे नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समोरच येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात भाजपचे सरकार येईल असा दावा केला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जालना शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.

अधिक वाचा  लॉकर किंवा भिंतीत नव्हे, चक्क वॉशिंग मशीनमध्ये दडवले होते 2.54 कोटी रुपये; ईडीच्या छाप्यात झाले उघड

यावेळी दानवे उपस्थितांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही जिल्ह्यात आमदार खासदारांना त्यांचा मान द्या, राज्यात गोंधळ सुरू आहे म्हणून हे म्हणत नाही, आमचं उद्घाटनाच्या पत्रिकेत नावं नसतं, अधिकार्‍यांना प्रोटोकॉल लक्षात येत नाही? सकाळी फोन करून सांगतात, ही चांगली पध्दत नाही. सरकार येतील सरकार जातील, आम्ही विरोधी पक्षात असलेलं चांगलं आहे, असं बोलता येतं. दोन तीन दिवसात हेही बंद होणार आहे, टोपे साहेब लक्ष ठेवा. असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. त्यांच्या या सूचक वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. तसेच दोन तीन दिवसात भाजपचं सरकार राज्यात येणार का असा प्रश्न विचारला जातोय.

अधिक वाचा  अनुराग कश्यपला 15 मिनिटांसाठी भेटायचं असेल तर द्यावे लागतील इतके रुपये; शेअर केली पोस्ट

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजपने याच्याशी आमचा संबंध नसल्याचे सांगत ही शिवसेनेतील अंतर्गत गोष्ट असल्याचे म्हटले होते, तसेच वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. दरम्यान रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्यामुळे पुन्हा भाजपने या राजकारणात उडी घेतल्याचे दिसत आहे. नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात भाजपचे सरकार येणार का, याबाबत सूचक विधान केलं आहे.