बॉलीवूड दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी शुक्रवार, 15 एप्रिल 2022 रोजी एक मोठी घोषणा केली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’च्या यशाने उत्साहित झालेल्या दिग्दर्शकाने घोषणा केली आहे की ते लवकरच त्यांच्या ‘द दिल्ली फाइल्स’ या नवीन चित्रपटावर काम सुरू करणार आहे. 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या रानटी अत्याचाराची कहाणी दाखवून ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या विवेक अग्निहोत्रीने यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, दिल्ली फाइल्स या नवीन चित्रपटावर काम सुरू करण्याची संधी आली आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी शुक्रवारी सकाळी ट्विटरवर लिहिले, ‘ज्यांनी काश्मीर फाइल्स पहिला त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. गेली 4 वर्षे आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे मेहनत घेतली. मी कदाचित अनेकांची मने दुखावली असतील, पण काश्मिरी हिंदूंवर झालेल्या नरसंहाराची आणि अन्यायाची कथा लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. आता माझ्या नवीन चित्रपटावर काम सुरू करण्याची वेळ आली आहे. याच ट्विटसह आणखी एका ट्विटमध्ये दिग्दर्शक साहेबांनी #TheDelhiFiles असे लिहिले आहे.
गेल्या महिन्यात 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. अवघ्या 25 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिक कमाई केली आहे. इतकंच नाही तर या चित्रपटात काश्मिरी पंडितांवरील अमानुष अत्याचार पाहून सिनेमागृहांमध्ये घोषणाबाजी होत असतानाच राजकीय घराण्यातही खळबळ उडाली होती.
या चित्रपटाच्या क्रेझने 1975 मध्ये रिलीज झालेल्या ‘जय संतोषी मां’ आणि 1994 मध्ये आलेल्या ‘हम आपके है कौन’ला प्रेक्षकांच्या प्रतिसादाची आठवण करून दिली. दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्यासोबतच चित्रपटातील कलाकार अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांचेही खूप कौतुक झाले आहे, तर आता दिग्दर्शकाने इतिहासाच्या आणखी एका वादग्रस्त मुद्द्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा करून चर्चेला तोंड फोडलं आहे.
विवेक अग्निहोत्रीच्या या नव्या प्रोजेक्टबद्दल आधीच चर्चा होत होत्या. त्यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचेही वर्णन समाजात फूट पाडणारे आणि धर्मनिरपेक्ष समाजात द्वेष पसरवणारे असे होते. नाना पाटेकरांपासून प्रकाश राजपर्यंत अनेक दिग्गजांनी चित्रपटावर टीका केली. दरम्यान, विवेक अग्निहोत्रीच्या ‘द दिल्ली फाईल्स’ या नव्या चित्रपटाची घोषणा होताच, तो यात काय दाखवणार याविषयी लोक अस्वस्थ झाले आहेत. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी संबंधित काहीतरी दाखवले जाईल असा अंदाज काही यूजर्सना आहे. तर बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की ही कथा 2020 च्या दिल्ली दंगलीची असेल.
2020 ची दिल्ली दंगल 23 फेब्रुवारी 2020 पासून सुरू झाली. या दंगलींमध्ये दोन समुदायांमध्ये हिंसक हाणामारी झाली. यामध्ये एकूण 53 जणांचा मृत्यू झाला. त्यातील काहींना धारदार शस्त्राने मारले तर काहीना गोळ्या घालून ठार करण्यात आले. दंगलीतील मृतांमध्ये एक पोलीस कर्मचारी, गुप्तचर अधिकारी यांचाही समावेश आहे. हिंसाचार संपून आठवडा उलटूनही शेकडो जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मग देशाच्या राजधानीत उघड्या नाल्यांमध्ये मृतदेह सापडत गेल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या.