इतिहासाबद्दल असलेले प्रेम केवळ भावनिक न ठेवता योग्य कृतीची जोड देवून नव्या वाटा शोधणारे तरुण म्हणून स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानने आपले वेगळेपण जपले आहे. ऐतिहासिक वास्तू, विरगळ, विहिरी, अतिप्राचीन टाक्या, घाटवाटा यांचे संवर्धन, प्राचीन अवशेष असलेल्या जागा साफ करून इतिहासाचा ठेवा जपण्याचे काम प्रतिष्ठान करत आहे.

नुकतेच प्रतिष्ठान मधील पाणी संवर्धनाचा मूलमंत्र घेवून मुळशी तालुक्यातील तैलबैल किल्ल्याच्या मागे असणाऱ्या वाघजाई घाटावर पाण्याचे टाके आहे. टाक्या मधील गाळ व गवत वाढल्याने पाणी पिण्या अयोग्य होते,वाघजाई घाट हा देश व कोकण यांना जोडणारा अति प्राचीन पाली सरसगड वाघजाई घाट तैल बैल कोराईगड हा मार्ग आहे. समस्त ग्रामस्थ,दुर्गप्रेमी,भटके मंडळी या वाटेचा उपयोग करतात. पण पाणी प्यायची सोय नसल्याने पाणी वाचून उपासमार होते. ह्यावेळी भीषण पाणीटंचाई असल्याने हीच उपासमार टाळण्यासाठी स्वराज्याचे शिलेदार मार्फत ही मोहीम आयोजित केली होती.

अधिक वाचा  उदयनराजे जिंकले अन् राष्ट्रवादीही, पुष्पवृष्टीस २५ जेसीबींचे बुकिंग, हारतुऱ्यांची ऑर्डर, दणक्यात स्वागत

छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त ही पाणी संवर्धन मोहीम हाती घेवून वाघजाई घाटावर शिवप्रतीमा चे पूजन करून गाळ व गवत काढण्यास सुरुवात केली,पूर्णपणे मोकळा करून तो भाग स्वच्छ करण्यात आला. त्याच्या समांतर माती दगडांनी भित बांधून पाणी साठवण्याचे 2 टप्प्यात वर्गणीकरण केले, जुन्या टाक्याचा उपयोग पाणी पिण्यासाठी तर दुसऱ्या बांधलेल्या टाकी चा उपयोग हात पाय धुवन्यासाठी केला आहे. वर त्यावर तात्पुरता पत्र्याची सोय केली आहे. त्यामुळे तिथे नैसर्गिक झरे पाणी साठण्यास सुरुवात होईल व जून पर्यंत पाणी साठा उपलब्ध असणार आहे. 5 तासाच्या रणरण त्या उन्हातील अथक परिश्रमानंतर छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा ध्येय मंत्र घेवून मोहिमेची सांगता करण्यात आली.

अधिक वाचा  मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी, कार्यकर्ते आपापसात भिडले

प्रतिष्ठानचे मंगेश नवघणे म्हणाले, सह्याद्री च्या माथ्यावर अनेक घाट वाटा आहेत. ह्या वाटा देश आणि कोकणला जोडतात.ह्या वाटाचे संवर्धन करून पर्यटन विकास होऊ शकतो. सोई सुविधा उपलब्ध झाल्यावर गड किल्ले धबधबे लेणी यांच्या पर्यटक वाढ मुळे देश आणि कोकण मधील गावे व पाड्यावरचे लोकांना रोजगार मिळेल. या मुळे वेळेची व इंधनाची बचत होते. हितसंबंध राखले जाते. यामोहिमेत भारत रेणुसे, स्वहित कळंबटे, निखिल चोरगे, अभिजित शिंदे, रोहित कळंबटे, मंगेश नवघणे सहभागी झाले होते.

वाघजाई घाट याबद्दल थोडक्यात माहिती

पुर्वीच्या काळात म्हणजे अगदी सातवाहन, प्रतिष्टाणच्या (प्रतिष्टाण म्हणजे पैठण), आणि त्याही पुर्वी प्राचीन भारताचा समुद्र मार्गे जगातील इतर देशांशी व्यापार व्हायचा. आपली सह्याद्रीची रांग भारताचे प्रामुख्याने दोन भाग करते. पहिला म्हणजे देश याचा अर्थ सह्याद्री रांगेच्या पुर्वेकडील प्रदेश (पश्चिम महाराष्ट्र व बाकी सगळा भारत देश) व दुसरा भाग म्हणजे कोकण. कोकणातील माणुस जर घाट चढुन वर येत असेल तर तो म्हणायचा “देशावर चाललोय”! कोकणात समुद्र किना-यावरील विविध बंदरांतुन व्यापार व्हायचा. देश व कोकण यांना जोडणा-या अनेक घाटवाटा अगदी प्राचीन काळापासुन अस्तित्वात आहेत. त्यावेळी पाली – सरसगड -ठणाळे लेणी – वाघजाई घाट – तैलबैल – कोराईगड हा मार्ग होता.ह्याच मार्गावर असाच एक घाट म्हणजे आपल्या मुळशी तालुक्यातील वाघजाई घाट.

अधिक वाचा  धाराशिव लोकसभेत 400 पेक्षा जास्त उमेदवार? प्रशासन अलर्ट मोडवर, गठीत केली समिती

या घाटात आपणास आजही कोरीव पाय-या, पाण्याच्या टाकी, वाघजाई देवीच मंदिर, मूर्ती शिळा अशा प्राचीन खाणाखुणा दिसतील. घाटावरील लोक आज ही या घाट वाटा यांनी ये जा करीत असतात.