पुणे: पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात मॉलचा स्लॅब कोसळून 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 5 कामगार जखमी झाले आहेत.जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. हे सर्व कामगार परराज्यातील असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली आहे.

रात्री 10.45 वाजताची घटना असून बांधकाम सुरू असताना नियमांचं पालन करण्यात आलं नसल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि येरवडा पोलिसांच्या मदतीने मदतकार्य पार पाडण्यात आलं. दरम्यान यासंदर्भात दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली आहे.

पुण्यातील येरवडा शास्त्रीनगर वाडिया बंगल्याजवळ इमारतीची स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. तर या घटनेमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली.

अधिक वाचा  ‘बडे मिया छोटे मिया’ च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अक्षयनं टायगरला दिला ‘हा’ सल्ला, ऐकताच सगळ्यांना हसू अनावर

या घटनेबाबत राहुल श्रीरामे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम आज रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सुरू होते. त्या दरम्यान बेसमेंटची जाळी कोसळून त्यामध्ये 10 जण गंभीर जखमी झाले. त्यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य पाच जणांवर उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या साहाय्याने मदत कार्य पार पडले असल्याचे त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दुःख व्यक्त

पुण्यातील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट केलं आहे. पुण्यात झालेल्या बांधकाम अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. सोबतच जे जखमी झालेले आहे त्याची प्रकृती लवकर सुधारावी असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अधिक वाचा  उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या यादीमुळे आज महाविकास आघाडीतील एक नेता बनू शकतो बंडखोर

कशी घडली घटना

संबंधित घटना ही गुरुवारी रात्री उशिरा येरवाड्यातील शास्त्रीनगर चौक वाडिया बंगला गेट नंबर आठ नजीक घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरीक घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांकडूनही बचावकार्य करण्यात आलं. या घटनेनंतरचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये अग्निशमन दलाचे जवान लोखंडी सळईंखाली दबल्या गेलेल्या मजुरांना बाहेर काढताना दिसत आहेत. त्यासाठी अग्निशमन दलाचे जवान त्यांच्याकडे असलेल्या कटरच्या माध्यमातून लोखंडी सळई कापताना दिसत आहेत. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली.