नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन केलं. या कार्यक्रमात देशभरातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारले. या कार्यक्रमादरम्यान मोदी यांनी विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा झाल्यानंतर एक उपक्रम सांगितला आहे. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने अमृतवर्ष साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने मोदी यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प दिला आहे.

नेमका प्रकल्प काय?

“मी सांगतोय त्या मार्गानेच जा, असं मला सांगायचं नाही. मात्र मला आता तुम्हाला एका वेगळ्या परीक्षेसाठी तयार करायचं आहे. या परीक्षेत आपल्याला शंभर टक्के पास व्हायचंच आहे. या परीक्षेत आपल्याला आपल्या भारताला आत्मनिर्भर बनवायचं आहे. लोकल फॉर वोकलचा जीवनमंत्र बनवायचा आहे. माझा आग्रह आहे, जेव्हा तुमच्या बोर्ड परीक्षा संपतील तेव्हा सकाळपासून रात्रीपर्यंत तुमच्या वापरातील कोणत्या वस्तू देशात किंवा परदेशात बनले याचा अभ्यास करा.

अधिक वाचा  नरेंद्र मोदी पहिल्यांदाच प्रचारासाठी महाराष्ट्रात मुक्कामीच हे आहे कारण?; 10 दिवसांत मोदींचा दुसरा विदर्भ दौरा

आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या महोत्सवात आपल्या स्वातंत्र्य सेनानींबाबत तुम्हा सगळ्यांना माहिती मिळावी, यासाठी आपण अभियान सुरु केलं आहे. तुम्हालाही या अभियानासोबत जुडायचं आहे. तुम्ही आपल्या राज्यातील स्वातंत्र्याशी संबंधित 75 घटना शोधून काढा. ही घटना कोणत्या व्यक्तीच्या संघर्षाशी किंवा कोणत्याही क्रांतीविराशी संबंधित असू शकते. या घटनेला तुमच्या मातृभाषेत लिहा. या विषयावर वर्षभर काम करा. यासाठी तुमच्या शिक्षकांची मदत घ्या. डिजीटल माध्यमातून तुमचा हा प्रकल्प सादर करा. पालकांशी, आजी-आजोबांशी चर्चा करा”, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं.

मोदी आणखी काय म्हणाले?

नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे? हा परिक्षा पे चर्चाचा पहिल्यांदा वर्चूअल इडीशन आहे. तुम्ही जाणता आपण गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटाशी सामना करत आहोत. त्यामुळे अनेकांना वेगवेगळं इनोव्हेशन करावं लागत आहे. मलाही आपल्याला भेटण्याचा मोह आवरला गेला नाही. त्यामुळे मलादेखील एका नव्या फॉरमेटमध्ये तुमच्याजवळ यावं लागत आहे. तुम्हाला न भेटणं, तुमच्या चेहऱ्यावरील हास्य न दिसणं यामुळे माझं खूप मोठं नुकसान होत आहे. पण तरीही परीक्षा आहेत. त्यामुळे आपण परीक्षावर चर्चा करुया. यावर्षीही ब्रेक घेणार नाहीत. एक गोष्ट मी जरुर सांगू इच्छितो, ही परीक्षावर चर्चा आहे. पण फक्त परीक्षाचीच चर्चा नाही. भरपूर विषयांवर बातचित होऊ शकतो. हलकंफुलकं वातावरण तयार करायचं आहे.

अधिक वाचा  ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर जादूटोणा? घराबाहेर लिंबू, कुंकू, बाहुली तांत्रिक विधीने खळबळ

अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे घाबरायला हवं? तुम्ही पहिल्यांदा परीक्षा देताय का? मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा येते ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला परीक्षेची भीती नाही. तर तुमच्या आजूबाजूचं वातावरण तसं करण्यात आलंय. परीक्षा हेच जीवण असं वातावरण तयार करण्यात आलंय. मी सर्व पालकांना सांगू इच्छितो, ही सर्वात मोठी चूक आहे. आपण आवश्यकतेपेक्षा परीक्षेचा जास्त विचार करतो. आयुष्यात ही काय शेवटची परीक्षा नाही. हा तर छोटासा वाटा आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मित्रमंडळींनी तसं वातावरण तयार करु नका.

पूर्वी आई-वडील मुलांच्या प्रत्येक कामात सोबत असायचे. मुलाची क्षमता आई-वडिलांना माहिती असते. मुलाला प्रोत्साहन दिलं तर त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो. मात्र, आज आई-वडिलांना वेळ नाही. मुलांची क्षमता बघण्यासाठी परीक्षांमध्ये आलेले गुण बघितले जातात. मात्र, परीक्षे व्यतिरिक्त विद्यार्थ्यांमध्ये इतर चांगलेही गुण असतात. परीक्षा ही एक संधी आहे. आपल्याला घडवण्याची संधी आहे. पण आपण बऱ्याचदा परीक्षेला जीवण-मरणाचा विषय बनवतो.