मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर अभिनेत्री कंगना रानावत सतत ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं सांगत आहेत. तिचं असं म्हणणं आहे की, बॉलिवूडच्या माफियांनी सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं आहे. आता कंगना पाठोपाठ रंगोलीने सुशांतच्या पीआर टीमवर निशाणा साधला आहे की, यांच्यामुळेच सुशांत आणि अंकिताचा ब्रेकअप झाल्याच म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी सुशांत आणि अंकिताचा जवळचा मित्र संदीप सिंहने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत संदीप सिंहने तिघांच्या फोटोसोबत एक भावूक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच त्यामध्ये त्याने अधोरेखितपणे म्हटलं आहे की, सुशांतला फक्त अंकिताच वाचवू शकली असती. या पोस्टला रिपोस्ट करताना रंगोली चंदेलने सुशांतच्या पीआर टीमला जबाबदार धरलं आहे.
रंगोली आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो रिपोस्ट करताना त्याने म्हटलं आहे की,’संदीप खूप चांगल लिहिलं आहेस. सुशांतने एक फॅन्सी पीआर ठेवला होता जो मुव्ही माफीयाकरता काम करत होता. त्याच व्यक्तीने सुशांतला सांगितलं होतं की, तुझी एक्साइटिंग पेअर असणं अतिशय गरजेचं आहे. इथे कुणीही खरं प्रेमात पडत नाही. तर हे सगळं ब्रँडिंग आहे. आपलं स्वतःचं ब्रँड बनवणं महत्वाचं आहे. हीच वेळ आहे आपली कमकूवत बाजू विसरून रणवीर सिंह आणि रणबीर कपूर सारखं सुपर मॉडेलला डेट करणं गरजेचं आहे.’
पुढे तिने म्हटलं होतं की,’त्याला असं सांगितलं होतं की, मालाडमधील एका टीव्ही अभिनेत्रीसोबत राहण तुझ्या ईमेजसाठी चांगल नाही. जर तुला त्या लोकांसारखं बनायचं असेल तर तुला तसंच वागावं लागेल. तिथे राहा जिथे तो लोक राहतात अन्यथा तुला स्ट्रगलिंग टीव्ही अभिनेता म्हटलं जाईल.’ पुढे रंगोली सांगते की, सुशांत आणि अंकीताने एक घर देखील खरेदी केलं होतं. पण ते घर सुशांतने सोडलं आणि तो वांद्रे येथे शिफ्ट झाला. त्याच्या आजूबाजूला अतिशय नाटकी लोकं राहत होती असा आरोप रंगोलीने केला आहे.

अधिक वाचा  अनुराग कश्यपला 15 मिनिटांसाठी भेटायचं असेल तर द्यावे लागतील इतके रुपये; शेअर केली पोस्ट