मुंबई: महाराष्ट्रात हवापालट झाली असून उष्ण वातावरण गायब झालं आहे. पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे महाराष्ट्रावर पावसाचं आणि गारपिटीचं संकट आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांना हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. दक्षिणेकडून देखील सायक्लोनिक सर्क्युलेशन सारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे हवेत वेगानं बदल होत आहेत.

अर्ध्यापेक्षा जास्त ठिकाणी महाराष्ट्रात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस महत्त्वाचे असणार आहेत. दिवसा 4 दिवस हळूहळू तापमान वाढ होणार आहे. तर संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा असल्याने कमाल तापमानात घट होऊ शकते.

अधिक वाचा  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्री विजय शाह प्रकरणात एसआयटी स्थापन, या ३ आयपीएस अधिकाऱ्यांना देण्यात आली चौकशीची जबाबदारी

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि धुळे जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढचे चार दिवस असंच हवामान राहील यामध्ये विशेष बदल होणार नाही. धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील किंवा हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दुसरीकडे जळगाव, नाशिक, घाट परिसर, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, अकोला, बुलढाणा, चंद्रूपर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात पुढचे चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या भागात ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा इशारा दिला आहे.

अधिक वाचा  World Hypertension Day : रक्तदाब वाढण्याचे कारण म्हणजे उच्च कोलेस्ट्रॉल, अशा प्रकारे करा नियंत्रित