जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले .यात भारताने पाकिस्तान विरुद्ध आता आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे .पाकिस्तान वर आता डिजिटल स्ट्राइक सुरू झालाय .भारताने पाकिस्तान सरकारच्या सोशल अकाउंट वर बंदी घातली आहे . बुधवारी सायंकाळी झालेला बैठकीत भारताने पाच मोठे निर्णय घेतले होते यामध्ये अटारी सीमा बंद करण्यासह इतरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते आता भारताने पाकिस्तानच्या सोशल मीडिया बाबत मोठी कारवाई केली आहे .

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण 26 जणांना गोळ्या घालून ठार करण्यात आले .यात 25 भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकांचा समावेश आहे .या हल्ल्यानंतर ए एन आय चे पथक बुधवारी श्रीनगर आणि नंतर पहलगाम येथे पोहोचले .एन आय ए च्या पथकाचा सध्या कसून तपास सुरू आहे .जम्मू आणि काश्मीर पोलीस ही त्यांच्यासोबत आहेत .बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीसीएस बैठकीत पाकिस्तान विरुद्ध पाच मोठे निर्णय घेतले .

अधिक वाचा  उद्धव ठाकरेंचा स्थानिकच्या ‘मिनी विधानसभे’चा मास्टरप्लॅन रेडी; मातोश्रीवर काय ठरलं? ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी

पाकिस्तानच्या x अकाउंटवर बंदी

देशाच्या आयटी मंत्रालयाने एक्स कंपनीला भारतातील पाकिस्तानी सरकारचे खाते ब्लॉक करण्यास सांगितले होते .पहलगामा मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हे पाऊल उचलले आहे भारताने पाकिस्तानच्या अधिकृत X अकाउंट वर भारतात बंदी घातली आहे .

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालया बाहेरील पोलीस सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे .पहलगाम हल्ल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था पाकिस्तान आणि उच्चायुक्तालयाबाहेर वाढवली होती .मात्र दिल्ली पोलिसांनी आता सर्व बारिकेट झटवले आहेत .त्यांना एका आठवड्याच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे .अनेक लोक पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शनेही करत आहेत . पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानशी असलेले सर्व राजनैतिक संबंध संपवणे भारतातील पाकिस्तानच्या फेसबुक आणि youtube चॅनलवर बंदी घालणे. असे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. जेणेकरून पाकिस्तानला त्याच्या दहशतवादी कारवायांविरुद्ध ठोस पावले उचलण्यास भाग पाडता येईल.

अधिक वाचा  मराठवाड्यात पाच दिवसांपासून ‘मॉन्सूनपूर्व’ जोरदार; वीज कोसळून 3 जणांचा मृत्यू; गुरे दगावली झाडे पडली वीज खंडित