काश्मीरच्या पहलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन येथे बुधवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे देशभरामध्ये पडदास उमटत असून या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताने पाच धोरणात्मक निर्णय घेत सिंधू जल करार रद्द केला असून पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारताने काही कठोर निर्णय घेण्याबरोबर दिल्लीतील उच्चायुक्तालयाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. एकीकडे असं असतानाच दुसरीकडे नवी दिल्लीमधील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयामध्ये चक्क केक मागवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

अधिक वाचा  ज्योतीच्या ४८७ व्हिडिओंमध्ये लपलेले ‘गुपित’ शोधत आहेत एजन्सी, पहलगाम हल्ल्यानंतर तिने असे काय केले ज्यामुळे ती चर्चेत आली?

उच्चायुक्तालयामध्ये केक

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमधील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाबाहेर एक कर्मचारी चक्क केकचं बॉक्स घेऊन जाताना दिसला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी हे सारं सेलीब्रेशन कशासाठी असा प्रश्न या केक घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला विचारला असता त्याने काहीही उत्तर दिलं नाही. ही व्यक्ती हातातील बॉक्स घेऊन उच्चायुक्तालयाच्या मुख्य द्वारातून आतामध्ये शिरली.

मात्र एकीकडे भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील कट कारस्थान पाकिस्तानामध्ये शिजल्याची दाट शक्यता असतानाच दुसरीकडे पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक मागवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नेमकं कोणत्या गोष्टीचं पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयामध्ये सेलीब्रेशन झालं हा कुतूहलाचा प्रश्न आहे.

अधिक वाचा  तासाभराच्या पावसाने पुणे जलमय, रस्ते पाण्यात; पुणेकर वाहतूक कोंडी अडकले

दूतावासाबाहेर निदर्शने

नवी दिल्लीमधील भाजपाच्या अल्पसंख्याक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शने केली आहेत. पाकिस्तान मुर्दा बादाच्या घोषणा यावेळेस कार्यकर्त्यांनी दिल्या. काही मुस्लिम कार्यकर्तेही दूतावासाबाहेर पाकिस्तानचा निषेध करत आहेत. सरकारने पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला योग्य उत्तर द्यावे, अशी मागणी आंदोलन करणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी केली आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीतून घोषणा करून शोकसभा आयोजित केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे.

मोदींना हलक्यात घेऊ नका

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या 27 पर्यटकांमध्ये डोंबिवलीमधील तीन पर्यटकांचा समावेश आहे. या तिन्ही पर्यटकांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी शहरातील स्मशानभूमीममध्ये शोकाकूल वातावरणामध्ये अत्यंसंस्कार करण्यात आले. दरम्यान, डोंबिवलीमध्ये बुधवारी सायंकाळी रस्त्यावर उतरून भाजपाने निदर्शने केली. काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेला हल्ल्याच्या निषेधार्थ आज म्हणजेच 24 एप्रिल रोजी डोंबिवली बंदची हाक देण्यात आली. नरेंद्र मोदींना तुम्ही हलक्यात घेऊ नका. काही दिवसातच तुमचे डोळे पांढरे होतील असा इशारा आंदोलकांनी पाकिस्तानला दिला. रस्त्यावर उतरून भाजपा कार्यकर्त्यांनी आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली.

अधिक वाचा  पुणे विमानतळावरील उड्डाणे पूर्वीप्रमाणे सुरळीत; प्रवाशांना मोठा दिलासा!