बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींची बी टीम बीडमध्ये अजूनही सक्रिय असल्याचा गंभीर आरोप केला आहे.शिवाय या टीमकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले आहेत. तरीही या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

एकीकडे देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुंडाराज उजेडात आला आहे. तर अनेक आरोपींना पोलिसांचंच पाठबळ असल्याचंही उघडकीस आलं होतं. या हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडसह इतर आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत. मात्र, कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.

अधिक वाचा  पुण्यातील ‘या’ भागात तयार होणार ग्रीन फील्ड एअरपोर्ट ! भूसंपादनासाठी एमआयडीसी 3500 कोटी उभारणार

तर याच सर्व आरोपींना मदत करणारी बी टीम अजूनही बीडमध्ये ॲक्टिव्ह असल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलं असून पोलिस फरार आरोपींच्या मुसक्या कधी आवळणार आणि देशमुख कुटुंबियांना कधी न्याय देणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

धनंजय देशमुख नेमकं काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, “बीड पोलिसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना अद्याप ताब्यात घेतलेलं नाही. या आरोपींकड पोलिस त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

या बी टीमनेच विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे यांच्यासह इतर आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली आहे. त्यांनीच आरोपींना पळीन जाण्यासाठी गाडी आणि पैसे पुरवले. मात्र, बीड पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत.” शिवाय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना पळून जाण्यासाठी पोलिसांनी मदत केल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  महापालिकेची ५ कोटीची निविदा मर्जीतील ठेकेदाराला न दिल्याच्या रागातून माजी नगरसेवकाची कामगारांना मारहाण; राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा ऐरणीवर