नगर लंके विजयानंतर ‘मुरब्बी नेता’ अजितदादांच्या भेटीस, सगे-सोयऱ्यांच्या राजकारणातील प्रमुख, मोठा विषय सुरू?

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फारसे यश आले नसले तरी विधानसभेच्या दृष्टीने राजकीय सोय म्हणून अनेक नेते पवार यांच्या पक्षाकडे पहात असल्याचे दिसते. नगर जिल्ह्यातील भाजपचे नेते, माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनीही अजितदादांची मुंबईत भेट घेतली आहे. या भेटीचे छायाचित्र कर्डिले यांचे पुत्र अक्षय यांनी सोशल मीडियात शेअर केले आहे. त्यावरून आता राजकीय चर्चा सुरू झाल्या असून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी नेहमीचा मतदारसंघ राहुरी यासोबतच श्रीगोंदयातूनही कर्डिले चाचपणी करीत आहेत. तेथील जागा अजितदादांच्या वाट्याला गेल्या तर आपला दावा कायम रहावा यासाठी कर्डीले यांची भेट असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि नगर जिल्ह्यातील मुरब्बी राजकारण्यांपैकी एक असलेले शिवाय सगे-सोयऱ्यांच्या राजकारणातील प्रमुख सूत्र असलेले कर्डीले यांनी अजितदादांची भेट घेतल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चा रंगली आहे. मागील विधानसभा निवडणूक कर्डीले यांनी भाजपकडून राहुरीमधून लढविली होती. तेथे राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला होता. यावेळी कर्डीले पुन्हा इच्छूक आहेत. याशिवाय बदलत्या राजकीय समीकरणाचा फायदा घेत कर्डीले श्रीगोंद्यातूनही चाचपणी करीत आहेत. तेथे भाजपचे आमदार बबनराव पाचपुते आहेत.

प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का? याची शाश्वती वाटत नसल्याने कर्डीले तेथून जोर लावण्याच्या प्रयत्न आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत श्रीगोंद्यात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले आहे. तर राहुरीत महायुतीला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे कर्डीले यांचे प्राधान्य राहुरीला असू शकते. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला. मात्र, राहुरीत त्यांना मताधिक्य मिळाले आहे. पराभवानंतर एका कार्यक्रमात बोलताना विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत आपण कर्डीले यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करू, असे सांगितले आहे.

अजितदादांचा पक्ष महायुतीमध्ये आहे. त्यांच्याकडून ८० जागा मागितल्या जात आहेत. मुख्य म्हणजे जेथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्या जागांवर अजितदादा दावा करू शकतात. त्यामुळे राहुरीची जागा त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. शिवाय श्रीगोंद्यातही अजित पवार गटाने विस्तार केला आहे. त्यामुळे गरज पडल्यास अजितदादांच्या पक्षाकडून निव़डणूक लढविता यावी, यासाठी कर्डीले यांनी आतापासूनच तयारी सुरू केली असल्याचे सांगण्यात येते. श्रीगोंद्याची जागा मिळविण्यासाठी तेथील इच्छुकांची संख्या लक्षात घेता कर्डीले यांना जड जाणार आहे. राहुरीत मात्र फारशी अडचण येण्याची शक्यता नाही. याशिवाय कर्डीले यांनी त्यांचे पुत्र अक्षय यांनाही आता राजकारणात पुढे आणले आहे.

विधानसभेसाठी सोय म्हणून कर्डीले यांना अजितदादांच्या पक्षात जावे लागले तर अजितदादांच्या गटाला नगरमध्ये मोठा नेता मिळणार आहे. कर्डीले यांचे जावई नगर शहराचे आमदार संग्राम जगताप अजितदादांच्या गटात आधीच गेलेले आहेत. कर्डीले आणि जगताप यांच्या माध्यमातून अजितदादा गटाला जिल्ह्यात आणखी फायदा होऊ शकतो. दुसरीकडे नगर जिल्ह्यात ज्येष्ठ नेते शरद पवार आता आणखी ताकदीनिशी उतरणार आहेत. अशा परिस्थितीत भाजप आणि अजितदादा गटालाही मोर्चेबांधणी करणे भाग असल्याने येत्या काही काळात अशा राजकीय हालचाली वेगाने होताना पहायला मिळणार आहेत.

Hot this week

कॅम्प मुक्तिधाम येथे श्री शिव महाकालेश्वर मंदिरात भव्य महाशिवरात्री महोत्सव उत्साहात

पुणे, प्रतिनिधी : पुणे येथील कॅम्प परिसरातील मुक्तिधाम स्मशानभूमी...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती...

Topics

कॅम्प मुक्तिधाम येथे श्री शिव महाकालेश्वर मंदिरात भव्य महाशिवरात्री महोत्सव उत्साहात

पुणे, प्रतिनिधी : पुणे येथील कॅम्प परिसरातील मुक्तिधाम स्मशानभूमी...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती...

तब्बल ४८ वर्षांनंतर केंदूर–पाबळकडे अध्यक्षपदाची संधी?

माजी सभापतींसह १४ सरपंच एकवटले; राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत शिरूर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img