शिंदे सरकारचं यंदाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार नागपुरात मुक्कामी आहे. संत्रानगरीतउद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल. सध्याच्या राज्यातील प्रश्नांना घेऊन हे अधिवेशन वादळी ठरण्याचीशक्यता आहे. या अधिवेशनाच्या काळात विविध आंदोलनं होणार आहेत. जवळपास 100 मोर्चे विधिमंडळात धडकणार असल्याचीमाहिती आहे. यातच्या 45 पेक्षा जास्त मोर्चांना आतापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सभागृहासह सभागृहाच्या बाहेरच्याआंदोलनांनी यंदाचं अधिवेशन गाजणार आहे.

कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

उद्यापासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्दे चर्चिले जाण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात गाजत असलेला मराठाआरक्षणाचा मुद्दा यंदाच्या अधिवेशनात चर्चेत येऊ शकतो. मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही विरोधक लावून धरूशकतात. काही दिवसांआधी राज्यात अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीची भरपाई, शेतकरीआत्महत्या, बेरोजगारी या मुद्द्यांवरुन सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ३३७ कोटींचा बॉम्ब; हिशोबच लागत नाही भाजपकडून प्रश्नांची सरबत्ती, विषय पुन्हा तापला

संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम

थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्याचं नागपुरात आगमन होईल. पाच वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीचहानापाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सरकार वतीने आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमालाविरोधक हजेरी लावणार? की विरोधक बहिष्कार घालणार हे पाहणं महत्वाचं असेल. आज संध्याकाळी सहा वाजता मंत्रिमंडळाचीबैठक होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत.

विरोधी पक्षांची बैठक

अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनिती ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. विरोधकांच्या बैठकीत विरोधीपक्ष नेतेविजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचीमाहिती आहे.

अधिक वाचा  भाजपची विधानपरिषदेची 3 नावं ठरली, उमेदवारांच्या नावासाठी हालचाली सुरू याचं नाव पुन्हा दिल्लीला पाठवलं, अन्य 2 नावंही समोर!