राज्यातील सध्याचं शिंदे सरकार हे बेकायदेशीर आहे. जनतेचा या सरकारवर विश्वास नाही. आता सुरु असलेल्या आमदार अपात्रताप्रकरणात हे लोक अपात्र होतील आणि शिंदे सरकार जाईल, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे वारंवार टीकाकरत आहेत. यावर बोलताना शिंदे गटातील खासदाराने जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरेंवर उद्धव ठाकरे पेक्षा संजय राऊतयांचीच छाप पडलेली आहे. त्याचमुळे आदित्य ठाकरे प्रसिद्धीत राहण्यासाठी उलट सुलट स्टेटमेंट करत असतात, असं म्हणत शिवसेनाखासदार खासदार प्रतापराव जाधव यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

अधिक वाचा  आजपासून महाकुंभ 2025 चा शुभारंभ, साधू-संत आणि भाविक पहिल्या शाही स्नानासाठी दाखल; मोदींकडून शुभेच्छा

संजय राऊतांवर घणाघात

एकनाथ शिंदे राजस्थान प्रचार करत आहेत. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली. यावरही प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिलीय. संजय राऊत यांनी गोव्यात जाऊन ज्यांचा प्रचार केला त्यांना तीन अंकात सुद्धा मत पडली नाहीत. त्यामुळे त्यांना कुणालाही पनौतीम्हणायचा अधिकार नाही. तो स्वतः एक पनौती आहेत. ते उद्धव ठाकरेंना लागलेली पनौती आहेत. त्यांच्याचमुळे शिवसेना फुटली, असं प्रतापराव जाधव म्हणाले.

शिंदे गट आणि अजित गटातील आमदारखासदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. त्यावर बोलतानादोन्ही पक्षांची युती मागील 30 वर्ष होती. समविचारी आणि हिंदुत्ववादी पक्ष आहेत. त्यामुळे भाजपा शिवसेना वर किंवा शिवसेनाभाजपा वर निवडणूक लढवण्याचा काही विषय नाही. चिन्ह हा काही मोठा विषय नाही, असं प्रतापराव जाधव म्हणाले.

अधिक वाचा  कॅलिफोर्नियातील भीषण वणव्यात आलिशान घरं जळून खाक; काहींवर घर सोडण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर

सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र

शिंदे गटातील काही लोक भाजपमध्ये जाणार, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. यावरही प्रतापरावजाधव म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी आपल्याकडे उरले सुरले खासदार त्यांनी सांभाळावेत. त्यांचेच खासदार अमोल कोल्हे हे अजितदादांना भेटले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. शिंदे गटाच्या खासदारांची त्यांनी काळजी करू नये. आम्हाला सांभाळण्यासाठीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत, असंही प्रतापराव जाधव म्हणालेत.

राहुल गांधींवर निशाणा

राहुल गांधीनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या. त्या ठिकाणचे 90 टक्के पेक्षा जास्त उमेदवार पराभूत झालेत. नरेंद्र मोदींच्या सभा तरसोडाच पण त्यांच्या नावावर अनेक उमेदवार निवडून आले. त्यामुळे पनौती कोण आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकताआहे, असं प्रतापराव जाधव म्हणालेत.