राज्याच्या सत्तासंघर्षाचा खटला सुप्रीम कोर्टात चालू होता. त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराला ब्रेक लागला होता. अखेर राज्याच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आहे. आमदारांच्या अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं आपल्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिंदे सरकार बचावल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिपदासाठी शिंदे गट आणि भाजपमधील अनेक आमदार देव पाण्यात घालून बसल्याचं चित्र आहे.

संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एवढंच नाही तर एकूण वीस आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील म्हटलं होतं

अधिक वाचा  पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात राक्षसी गँगरेप! 19 वर्षांची मुलगी, 23 मुलांचा 6 दिवस.., ‘अशी’ घटना मोदीही अस्वस्थ